लवकरच ‘मि. इंडिया’ सारखी अदृष्य होण्याची शक्ती भारतीय जवानांना मिळणार

kanpur-IIT
नवी दिल्ली : ‘मिस्‍टर इंडिया’ चित्रपटातील अदृश्य होणारा फॉर्मूला आयआयटी कानपूरच्या वैज्ञानिकांनी शोधून काढला असून मेटा-मेटेरियलचा शोध लावल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही गोष्ट घातल्याने किंवा अंगावर ओढून घेतल्याने भारतीय लष्कराचे जवान, त्यांचे टँक, लढाऊ विमान, कॅमेरे यामुळे दिसणार नाही. शत्रूंची ठिकाणे आणि त्यांचा खात्मा करण्यासाठी याची मदत होईल.

भारतीय जवान सर्जिकल स्ट्राईक करण्यात कुशल आहेत. वाळवंट असो किंवा रक्त गोठवणारा बर्फाळ प्रदेश असो कोणत्याही परिस्थितीत भारताचे जवान चोख उत्तर देण्यास तयार आहेत. पण देशांची संपत्ती आणि अनेक लढाऊ सामग्रीचे या दरम्यान नुकसान होते. हे नुकसान होऊ नये म्हणून आता आय़आयटी कानपूरच्या वैज्ञानिकांनी एक नवा शोध लावला आहे. ज्यामुळे भारतीय जवान, त्यांचे शस्त्र आणि रणगोडे सुद्धा दिसणार नाही आहेत.

या मेटामटेरियल तंत्रज्ञानाची माहिती घेण्याआधी जवान आणि त्यांची युद्ध सामग्री शत्रूंच्या नजरेत कशी येते याची माहिती घेणे आवश्यक आहे. अंधारात व्यक्ती किंवा वस्तू हिट रेडिएशनमुळे शरीराच्या तापमानाने व्यक्तीचे अस्तित्व दिसून येते. विमानाला रडारचे तरंग धडकल्याने त्याचे संकेत देखील मिळतात. पण मेटामटेरियल हे आवरणाचे काम करणार आहे.

सगळेच मेटीरियल पदार्थ हे नैसर्गिकरित्या बनलेले आहेत. पण प्लास्टिक सारख्या तत्वांपासून मेटामटेरियल हे बनलेले एक धातू आहे. हे मेटामटेरियल विद्युत चुंबकीय तरंगांमध्ये हेरफेर करण्यासाठी आवरणाचे काम करतील. वैज्ञानिकांनी हा शोध १९८७ मध्ये आलेला सुपरहिट चित्रपट मिस्टर इंडियाच्या आधारे लावल्याचे म्हटले आहे. या चित्रपटात अनिक कपूर हातात एक घड्याळ घातल्यानंतर अदृष्य होतो. या सिद्धांतावर याचा शोध लावल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

आयआयटी कानपूरच्या वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, त्यांनी शोधलेल्या या धातूचे जर वस्त्र जवानांनी घातले तर ते अदृष्य नाही होणार पण अंधारात रात्रीच्या वेळी ते शत्रूच्या कॅमेऱ्यात दिसणार नाहीत. या धातूचे कपडे घातल्यानंतर कोणत्याही प्रकारचे आरएफ सेंसर, ग्राउंड रडार, एडवांस बॅटल फील्ड रडार आणि इंफ्रारेड कॅमरे तुम्हाला शोधू शकणार नाहीत.

असाच एक धातू अमेरिकेने देखील विकसित केला आहे. पण हा धातू खूप वजनदार आहे. याचा वापर खूप मर्यादीत आहे. याचे परिक्षण आयआयटी कानपूर डीआरडीओने सुरु केले आहे. भारतीय लष्कर परिक्षण झाल्यानंतर अजून मजबूत होणार आहे.

Leave a Comment