या गोष्टीसाठी आता पॅनकार्ड अनिवार्य

pan-card
मुंबई : पॅनच्या नियमामध्ये आयकर विभागाने बदल केला असून आयकर विभागने याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार एका आर्थिक वर्षात जर २.५ लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार करणाऱ्या लोकांकडे आता पॅनकार्ड असणे आवश्यक असणार आहे. ३१ मेच्या आधी यासाठी अर्ज करणे आवश्यक असणार आहे. एक वर्षामध्ये ५ लाखाच्या वर खरेदी, विक्रीमधून मिळणारी रक्कम असेल तरी त्यांना पॅनकार्ड आवश्यक असणार आहे.

खरेदी-विक्री, कर आयकर विभागाला आकारता यावा यासाठी हा नियम बनवण्यात आला आहे. सोबतच पॅनकार्डसाठी अर्ज करताना आई-वडिलांपासून वेगळे झाल्यानंतर वडिलांचे नाव लिहिण्याची अट आयकर विभागाने रद्द केली आहे. एक अधिसूचना आयकर विभागाने जारी केली आहे. अर्ज करत असताना जर अर्जदाराला आईचे नाव लावायचे असेल तर अर्जदार तसेही करु शकतो. सध्या पॅनकार्डवर अर्जदाराच्या नावाखाली वडिलांचे नाव असायचे. पण लग्नानंतर जर महिलेला आईचे नाव लावायचे असेल तरी तसा अर्ज करु शकता.

५ डिसेंबरपासून नवा नियम लागू होणार असल्याची माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. जर आई-वडिलांमध्ये फक्त आई असेल. तर ती व्य़क्ती पॅनकार्डवर आईचे नाव देऊ शकते. जर वडील वेगळे झाले असतील.

Leave a Comment