राष्ट्रगीत असताना ‘वंदे मातरम्’चा आग्रह कशाला? – प्रकाश आंबेडकर

praskah-ambedkar
परभणी : ‘वंदे मातरम्’ला ‘एमआयएम’नंतर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रगीत असताना ‘वंदे मातरम्’चा आग्रह कशाला? असा सवाल उपस्थित केला आहे.

एमआयएमचाच नव्हे, तर आमचाही वंदे मातरमला विरोध आहे. वंदे मातरम राष्ट्रगीत नसल्यामुळे त्याची कुणावरही सक्ती करता कामा नये. ‘जन गण मन’ हे अधिकृत राष्ट्रगीत असताना आणखी पर्यायी दुसरे गीत कशाला हवे? राष्ट्रगीतावर भाजपचा विश्वास नाही का? असे प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केले. प्रकाश आंबेडकर परभणीत आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमच्याशी काँग्रेस पक्षाला मैत्री करायची असती तर एवढ्यात हालचाल झाली असती. दिल्लीतून दोन महिन्यात कोणतेही संकेत नाहीत. याचा अर्थ असा की, कॉंग्रेसला मी आणि वंचित बहुजन चालत नसल्यामुळे लोकसभेच्या सर्व जागा आम्ही लढणार असल्याची घोषणाही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केली. वंचित बहुजन आघाडीत असलेल्या धनगर समाजाला राष्ट्रवादीची साथ नको आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत युती करायला आंबेडकरांनी स्पष्ट नकार दिला.

Leave a Comment