नवी दिल्ली – दारिद्र्याचे भारतातून उच्चाटन होण्यास अजून बराच काळ लोटावा लागणार असला तरी देशात उच्च आर्थिक वाढीमुळे कोट्यधीशांच्या संख्येत हजारोने भर पडत आहे. भारतात यंदा कोट्यधीशांच्या संख्येत ७,३०० कोट्यधीश वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. क्रेडिट स्विसच्या अहवालानुसार, भारतामध्ये २०१७-१८ मध्ये ७,३०० लोक मिलेनियर क्लबच्या यादीत सामिल झाले आहेत. भारतामध्ये कोट्यधीशांची संख्या या नव्या लोकांमुळे ३.४३ लाख झाली आहे. या करोडपतींच्या कुटूंबियांची एकूण संपत्ती ६ ट्रिलियन डॉलर्स अर्थात ४४१ लाख कोटी रुपये आहे. देशातील करोडपतींची संख्या २०२० या वर्षापर्यंत तब्बल ३,८२,००० वर पोहोचण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
२०१७-१८ मध्ये भारतामध्ये ७,३०० लोक मिलेनियर क्लबच्या यादीत
देशातील गरीबी कमी झाली की नाही हा संशोधनाचा भाग आहे पण झपाट्याने देशातल्या करोडपतींची संख्या वाढतच आहे. क्रेडिट स्विसच्या अहवालानुसार भारतात करोडपतींची संख्या आणि गरीब-श्रीमंत तफावतीत २०२३ पर्यंत फरक पडेल. अहवालात म्हटले आहे की, भारतात संपत्तीच्या प्रमाणात भेलेही वाढ झाली असेल. पण, यात प्रत्येक भारतीयाचा हिस्सा नाही. देशातील नागरिकांकडे असलेली संपत्ती अद्यापही चिंतनाचा विषय आहे. अहवालातील आकडेवारीवरून दिसते की, १०,००० डॉलरपेक्षाही कमी सुमारे ९२ टक्के लोकांकडे संपत्ती आहे. तर, दुसऱ्या बाजूला संपत्तीचा मोठा हिस्सा काही लोकांकडेच आहे.