नाशिक – २०१९ नंतर संघाचा बळीचा बकरा पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरणार असल्याचे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आंबेडकर यांनी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता केलेल्या टीकेचाही हवाला दिला.
संघाचा बळीचा बकरा ठरणार पंतप्रधान नरेंद्र मोदी – प्रकाश आंबेडकर
२०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांत भाजपची सत्ता येणार नसल्याची खात्री संघाला झाली आहे. मला भैय्याजी जोशींच्या वक्तव्याने हिटलरची आठवण झाली. हिटलरवर त्याच्या सहकाऱ्यांनीसुद्धा अविश्वास दाखवला होता. तसेच आता आरएसएस आणि मोदींबाबत होत असल्यामुळे नोटबंदी, न झालेले सर्जिकल स्ट्राइक आम्ही केल्याचे ते सांगत असल्याचे आंबेडकर म्हणाले. सरकार आले नाही, तर कोणाला तरी बळीचा बकरा केला जाईल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता तूर्तास मला त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीच दिसत असल्याचे आंबेडकर म्हणाले.