यापुढे फक्त २० हजार रुपयेच एसबीआय एटीएममधून काढता येणार

SBI
मुंबई – एक महत्त्वपूर्ण निर्णय स्टेट बँक ऑफ इंडियाने घेतला असून तुम्ही स्टेट बँकेच्या एटीएममधून आता एका दिवसात जास्तीत जास्त २० हजार रुपये काढू शकणार आहात. हा नियम ३१ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

एटीएममधून यापूर्वी दिवसभरात ४० हजार रुपये काढण्याची मर्यादा होती. पण यामध्ये येत्या ३१ ऑक्टोबरपासून कपात होऊन ही मर्यादा २० हजारांवर येणार आहे. हा निर्णय एटीएममधील फसवेगिरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच डिजिटल व्यवहारांकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बँकेचा हा निर्णय किती योग्य आणि किती अयोग्य हे सांगणे अद्याप कठीण आहे. कारण, बाजारात सद्यस्थितीला रोख स्वरुपातील रकमेचे प्रमाण आधीपेक्षा जास्त आहे.

एकावेळी एटीएममधून २० हजार रुपये काढणे हे सर्वसामान्यांसाठी मुबलक आहे, असेही स्टेट बँकेने म्हटले आहे. ज्या ग्राहकांना यापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल त्यांना बँकेकडून विशेष प्रकारचे कार्ड दिले जाणार असल्याचे बँकेने नमूद केले.

Leave a Comment