कचऱ्यातून प्लास्टिक वेचणाऱ्याचा मुलगा झाला डॉक्टर


देवास (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशमधील देवास जिल्ह्यातील आसाराम नामक युवक डॉक्टर (एमबीबीएस) झाला असून, कचऱ्यातून प्लास्टिक वेचणाऱ्या रंजीत चौधरी आणि ममताबाई यांचा तो मुलगा आहे. आसारामने घरात अठरा विश्व दारिद्र असताना देखील परिस्थितीतीवर मात करून एमबीबीएस पूर्ण केले. ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज (एम्स) च्या प्रवेश परिक्षेत त्याची निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात आसारामचे कौतुक केले आणि त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या

हे कुटुंब देवासपासून ४० कि.मी. वर असलेल्या विजयागंजमध्ये वास्तव्यास असून एका लहानशा झोपडीत वास्तव्य करणाऱ्या या कुटुंबातील कर्ता पुरूष रंजीत चौधरी हे प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या वेचून त्या भंगारमध्ये विकणे हे काम करतात. ते कधीकधी शेतकाम देखील करतात. तर आसारामची आई ममताबाई या गृहिणी आहेत. आसारामने अशा या परिस्थितीत मन लाऊन अभ्यास केला आणि पहिल्या झटक्यात एमबीबीएस पूर्ण केले. आसारामची ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज (एम्स) च्या प्रवेश परिक्षेत निवड झाली आहे. हालाखीची परिस्थिती असतानाही आसारामची शिकण्याची जिद्द ही देशातील इतर मुलांना आणि मुलींना प्रेरणादायी असल्याचे सांगून, रविवारी आकाशवाणीवर पार पडलेल्या त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसारामचे कौतुक केले आहे.

ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज (एम्स) च्या प्रवेश परिक्षेत मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात कचऱ्यातून पास्टिक वेचून घर चालवणाऱ्याचा मुलाची निवड झाल्याबद्दल मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्राद्वारे आसारामला शुभेच्छा दिल्या. आसारामचे वडील कचऱ्यातून प्लास्टिक गोळा करतात व ते विकून अपले घर चालवतात. आसारामने मिळविलेल्या यशाबद्दल ते म्हणतात की, माझ्यासाठी तर हे सगळे स्वप्नवत आहे. कारण, एवढा विचार मी कधीच केला नव्हता.

Leave a Comment