६ दिवस घेता येणार नाही तिरूपती बालाजीचे दर्शन


आंध्रप्रदेशातील तिरूमाला येथे असलेल्या व्यंकटेश्वरच्या प्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिर इतिहासात पहिल्यांदाच ६ दिवसांकरिता भगवान व्यंकटेश्वरचे हे मंदिर बंद राहणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ११ ऑगस्ट संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते १७ ऑगस्टच्या सकाळी ६ पर्यंत हे मंदिर बंद राहणार आहे. हा निर्णय मंदिर प्रशासनाने नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला आहे. भाविकांना या निर्णयामुळे थोडा त्रास होणार आहे.

महासंप्रोक्षण अनुष्ठान करण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल १२ वर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुष्ठानादरम्यान फक्त पुजारीच मंदिरात प्रवेश करून शकतात. ते यावेळी मंदिरातील साफसफाई, शुद्धिकरण आणि डागडुजीचे काम करणार आहेत.

हे मंदिर १२ वर्षातून पहिल्यांदा होणाऱ्या या अनुष्ठानकरिता बंद राहणार आहे. अनुष्ठानाकरिता या अगोदर काही काळ मंदिरात भाविकांना प्रवेश नसे. पण पहिल्यांदा असे ६ दिवस हे मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. लाखो भक्त एका दिवसांत येतात त्यामुळे काही वेळ मंदिर बंद करणे शक्य नाही. या आधी गर्दी कमी असल्यामुळे ते शक्य होत असे.

Leave a Comment