
नवी दिल्ली – औद्योगिक धोरण आणि पदोन्नती विभाग यांनी केलेल्या सर्व्हेनुसार व्यापारामध्ये महाराष्ट्र पिछाडीवर पडला असून या क्रमवारीत महाराष्ट्राचा १३ वा क्रमांकावर आहे आणि विशेष म्हणजे या क्रमवारीत उत्तर प्रदेश १२व्या स्थानी आहे. तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, हरियाणा हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थानावर विराजमान आहे.
व्यवसायासाठी गुंतवणूकदारांची महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशाला पसंती
या सर्व्हेमध्ये गेल्या वर्षी महाराष्ट्र १०व्या स्थानी होता. पण यंदाच्या अहवालानुसार व्यवसाय क्षेत्रात तरी महाराष्ट्र पिछाडीवर गेला आहे. तर १४व्या उत्तर प्रदेश हे राज्य स्थानी होते. त्यामुळे उत्तरप्रदेश राज्याची गेल्या आर्थिक वर्षात व्यावसायिकरित्या चांगलीच भरभराट झालेली दिसून येते.
१२ क्षेत्रांतील नियामक प्रक्रिया, धोरणे, प्रथा आणि प्रक्रियेवरील सुधारणा सुधारण्यासाठी ३७२ शिफारसींचा बीआरपीमध्ये समावेश आहे. या ३७२ शिफारशींपैकी, ७८ प्रक्रिया गुणांमधून निवड करण्यात आली आहेत, वास्तविक वापरकर्त्यांकडून आणि व्यवसायाकडून ज्यासाठी अभिप्राय मिळेल. डीआयपीपी नवीन व्यवसाय, विद्यमान व्यवसाय, आर्किटेक्ट, इलेक्ट्रिकल कंत्राटदार व वकील यांच्याकडून अभिप्राय मागितला जातो. ही संकल्पना जागतिक स्तरावरील सहकार्याने विकसित करण्यात आली आहे, जी जागतिक स्तरावर १९०च्या क्रमवारीत व्यवसाय क्रमवारीत सुधारणा करण्यास तयार आहे.
