भारतात २०२२ पर्यंत येणार ५ जी


नवी दिल्ली : तंत्रज्ञान युगाच्या इतिहासात २०१८ हे वर्ष महत्त्वपूर्ण म्हणून नोंदले जाणार असून याच दरम्यान युजर्सच्या सेवेत ५ जी नेटवर्क येत असून डेटा खर्च होण्याचा मोठा बदलही यामध्ये पाहता येणार आहे. २०२३ मध्ये एकूण डेटा ट्रॅफिकच्या २० टक्के हा ५ जी आहे. हे प्रमाण सध्याच्या ट्रॅफिकचा विचार करता दिडपट जास्त आहे. ४ जी, ३जी आणि २ जी हे तिनही ट्रॅफिक यामध्ये असणार आहेत.

यासंदर्भातील माहिती स्वीडनचे दूरसंचार कंपनी एरिक्सनचे वरिष्ठ अधिकारी एरिक्सन यांनी दिली. ४ जी पेक्षा अधिक ५ जी वापर होईल अशी आशा व्यक्त केली जाते आहे. नव्या फिचर्सचे स्मार्टफोनही आगामी काळात येतील. त्यामुळे वर्चुअल रियॅलिटी (वीआर), अगमेंटेंड रियॅलिटी (एआर) आणि ४ के व्हिडिओ हे प्रमुख असतील. या टेक्निकल व्हिडिओ व्यतिरिक्त व्हिडिओच्या चारही बाजूस पाहण्याच्या दृष्टीने सक्षम बनविले जाईल. एरिक्सन यांच्यामते २०२२ पासून ५ जी चा उपयोग सुरू होईल. भारतात मोबाइल डेटा ट्रॅफिक वाढून ५ पट होणार आहे. २०१७ मध्ये हे १.९ एक्सबाइट (ईबी), जे वाढून १० एक्साबाइट होईल.

Leave a Comment