रोजगार निर्मितीसाठी अर्थव्यवस्थेत सुधारणा करत राहणे गरजेचे


नवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतात रोजगार निर्मितीसाठी ७.५ टक्क्यांची विकासदार पुरेसा नसल्याचे मत व्यक्त केले आहे. पुढील १० ते २० वर्षांचा विचार भारताने केला पाहिजे. रोजगार निर्मितीसाठी अधिक जोर लावावा लागेल. भारताने आर्थिक क्षेत्रातील सुधारणांना वेग दिल्यास लवकरच १० टक्क्यांचा विकासदर गाठू शकतो, असा सल्लाही त्यांनी दिला.

हाँगकाँगमध्ये आयोजित एका परिषदेत शिकागो विद्यापीठातील बूथ ऑफ बिझनेस स्कूलचे प्रोफेसर राजन बोलत होते. पायाभूत सुविधांवर भारतात भर दिला जात आहे. कंपन्यांसाठी मार्ग तयार केला जात आहे. भारताला व्यवसाय सुलभ बनवणे तसेच आरोग्य आणि शिक्षणाबरोबरच मनुष्यबळाच्या गुणवत्तेत सुधारणा केल्यास १० टक्के विकासदर गाठता येईल. एक महत्वपूर्ण पाऊल यासाठी उचलण्याची गरज आहे. आम्ही जर हे करू शकलो तर मला वाटते की आम्ही निश्चितपणे ७.५ टक्क्यांपेक्षा पुढे जाऊ. कारण प्रत्येकवर्षी १.२ कोटी लोकांना रोजगार देण्यासाठी हा विकासदर पुरेसा नाही. आम्ही दहापेक्षाही पुढे जाऊ शकतो. आम्ही असे करू शकतो, पण आम्हाला यावर काम करावे लागेल.

Leave a Comment