अॅक्सिस बँकेलाही घातली चार हजार कोटीची टोपी


मुंबई : बँक टोप्या घालण्याचे सत्र सुरूच असून आता आणखी एक बँक घोटाळा समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी अॅक्सिस बँकेच्या तक्रारीवरुन एका खासगी कंपन्यांच्या तीन संचालकांना अटक करण्यात आली आहे.

या खासगी कंपनीचे नाव पारेख अॅल्यूमिनेक्स लिमिटेड असे असून, बँकेला तब्बल चार हजार कोटींचा चुना कंपनीने लावल्याचा आरोप होत आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी भंवरलाल भंडारी, प्रेमल गोरागांधी आणि कमलेश कानूनगो यांना अटक केली आहे. ही कारवाई अॅक्सिस बँकेच्या तक्रारीनंतर करण्यात आली.

दरम्यान, बँकेचे अधिकारी देखील या घोटाळ्यात सहभागी असल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. अॅक्सिस बँकेच्या तक्रारीत अमिताभ पारेख, राजेंद्र गोठी, देवांशु देसाई, किरण पारेख आणि विक्रम मोरडानी यांच्याही नावांचा समावेश आहे. यातील अमिताभ पारेख यांचे २०१३ सालीच निधन झाले आहे. दुसरीकडे पारेख अॅल्यूमिनेक्स लिमिटेडविरोधात स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओवरसिस बँकेनेही यापूर्वीच तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन सीबीआय कंपनीचा कसून तपास करत आहे. पारेख अॅल्यूमिनेक्स लिमिटेड ही कंपनी रियल स्टेट डेव्हलपर्सकडे फंड डायव्हर्ट करत असल्याचा बँकेचा आरोप आहे.

Leave a Comment