जिओ मागे ईशाची प्रेरणा- मुकेश अंबानी


भारताला सर्वाधिक मोबाईल देटा वापरणारा देश अशी ओळख जगात मिळवून देण्याची कामगिरी अवघ्या दोन वर्षात केलेल्या रिलायंस जिओची कल्पना कन्या ईशामुळे मिळाल्याचे रिलायंसचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले. रिलायंस इंडस्ट्रीजला ड्रायव्हर ऑफ चेंज अवार्ड मिळाल्याबद्दल झालेल्या कार्यक्रमात बोलताना मुकेश अंबानी यांनी ही हकीकत सांगितली.

मुकेश म्हणाले २०११ मध्ये ईशा आणि आकाश ही जुळी भावंडे येल विद्यापीठात शिकत होती. त्यावेळी ईशा सुट्टीवर घरी आली होती. तेव्हा तिने घरातील इंटरनेट फारच वाईट आल्याची तक्रार माझ्याकडे केली. युवा पिढी जनरेशन बेस्ट साठी अधिक प्रतीक्षा करू शकत नाही आणि त्यामुळे ब्रॉडबँड इंटरनेट तंत्रज्ञान भारतापासून अधिक काळ लांब राहणे योग्य नाही असे पटविले. जिओचा जन्म या कल्पनेतूनच झाला आहे.

अवघ्या दोन वर्षात जिओमुळे फोन मार्केट मध्ये ३१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहेच पण जिओमुळे अन्य कंपन्यांना प्राईस वॉर मध्ये उतरणे भाग पडले होते.

Leave a Comment