२३ हजार कारचे होंडाकडून रिकॉल


नवी दिल्ली – एअर बॅगमध्ये चुका सापडल्याने होंडा कार्स इंडियाकडून २२,८३४ वाहने परत बोलविल्या आहेत. अकॉर्ड, सिटी आणि जाझ मॉडेल्सचा यामध्ये समावेश आहे. दुरूस्तीसाठी २०१३ मध्ये उत्पादन घेण्यात आलेल्या या मॉडेल्सच्या कार परत बोलविण्यात येणार आहेत. यामध्ये सिटी मॉडेलमधील २२,०८४ युनिट्स, प्रिमियम सेडान अकॉर्डची ५१० युनिट्स आणि जॅझच्या २४० युनिट्सचा समावेश आहे.

देशभरातील वितरकांकडून ही सेवा कंपनीकडून मोफत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी तकाटा या कंपनीकडून उत्पादन घेण्यात आलेल्या एअर बॅगमध्ये दुरुस्ती असल्याचे निदर्शनात आले होते. कंपनीने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ४१,५८० युनिट्सना रिकॉल केले होते. ही संख्या जुलै २०१६मध्ये १,९०,५७८ युनिट्स होती. जपानच्या टकाता कॉर्पोरेशनकडून नादुरुस्त एअरबॅग बनविण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील लाखो वाहनांना रिकॉल करण्यात आले आहे. भारतासाठी ही संख्या ३.१३ लाख युनिट्स आहे.

Leave a Comment