मोदी सरकार आता करणार नाणेबंदी!


नवी दिल्ली : मोदी सरकार नोटाबंदीनंतर आणखी एक दणका देण्याची शक्यता असून सरकार नोटाबंदीनंतर नाणेबंदीच्या निर्णयाची घोषणा करण्याची शक्यता आहे. नोएडा, मुंबई, कोलकाता आणि हैदराबादमधील टाकसाळीत नाणी पाडण्याची कामे यासाठी थांबवण्यात आली आहेत.

याबाबत रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या चारही टाकसाळींना मंगळवारपासून नाणी पाडण्याचे काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे नोटाबंदीनंतरचा हा आणखी एक दणका असल्याचे मानले जात आहे.

नोटाबंदीनंतर देशभरातील विविध टाकसाळीत मोठ्या प्रमाणात नाणी पाडण्यात आली होती. पण ही नाणी अजूनही मोठ्या प्रमाणात रिझर्व बँकेत स्टोअर करुन ठेवण्यात आली असल्याचे एक कारण नाणेबंदीसंदर्भात दिले जात आहे. याबाबतचा उल्लेख रिझर्व बँकेच्या एका नोटीसमधूनही करण्यात आला आहे. ८ जानेवारीच्या या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, २५०० लाखापेक्षा जास्त नाणी चलनविषयक धोरण समितीकडे स्टोअर असल्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत टाकसाळीत नाणी पाडण्याचे काम थांबवण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment