इंटरनेट वापराच्या यादीत भारत अव्वल


नवी दिल्ली : स्मार्टफोन आणि स्वस्त दरात मोबाईल डाटा रिलायन्स जिओने उपलब्ध करून दिल्याने टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ झाल्यानंतर इतर कंपन्यांनीदेखील त्यांचे दर कमी केले.

नीती आयोगाच्या माहितीनुसार दरमहा १५० कोटी गिगा बाईट्स मोबाईल डाटा भारत वापरत असून जगातील हा दर सर्वोच्च दर असल्यामुळे सध्या भारत मोबाईल डाटा वापराच्या स्पर्धेत अव्वल स्थानी आहे. ही माहिती नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. कांत यांच्यामते भारताचा मोबाईल डाटा वापर हा चीन आणि अमेरिका यांच्या युजर्सच्या वापराहूनही अधिक आहे. अमिताभ कांत यांनी या माहितीचा मूळ स्त्रोत कोणता आहे याबाबत माहिती दिलेली नाही.

Leave a Comment