अर्थ मंत्रालयाने फेटाळले चेकबुक बंदीचे वृत्त


नवी दिल्ली – अर्थ मंत्रालयाने देशातील बँकिंग व्यवहारात चेकबुक राहणार असल्याचे स्पष्ट केले असून केंद्र सरकार डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी चेकद्वारे होणारे सर्व व्यवहार रद्द करणार असल्याची चर्चा होती. पण असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे अर्थ मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (सीएआयटी) केंद्र सरकार धनादेश (चेक) व्यवहारातून बंद करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. केंद्र सरकार नोटाबंदीनंतर सातत्याने ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे. अनेक आकर्षक योजनाही डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढण्यासाठी आखण्यात आल्या होत्या. चेकबुक व्यवहारात कायम राहणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment