सूर्योदयाच्या वेळी का दिली जाते कैद्यांना फाशी?


एखाद्या आरोपीला कायद्याने मृत्युदंड तेचाच दिला जातो, जेव्हा त्याने केलेला गुन्हा हा अतिशय अमानवी, भयंकर आणि अक्षम्य स्वरूपाचा असतो. निरनिराळ्या देशांमध्ये ही मृत्युदंडाची शिक्षा देण्याच्या निरनिराळ्या पद्धती अवलंबल्या जातात. काही देशांमध्ये इंजेक्शनच्या मदतीने शरीरामध्ये हानिकारक रसायन टोचून मृत्युदंड दिला जातो, तर काही देशांमध्ये विजेच्या खुचीवर आरोपीला बसवून अतिशय तीव्र विजेचे झटके आरोपीला दिले जाऊन त्याला देहदंड दिला जातो. भारतामध्ये मात्र देहदंड दिल्या गेल्लेल्या आरोपींना फाशी देण्याची रीत आहे. ह्या देहदंडाच्या शिक्षांची अंमलबजावणी करण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागते. मृत्युदंडाच्या शिक्षेची वेळ केव्हा निश्चित केली जावी याबद्दलचे नियमही ठरलेले आहेत, व त्यांचे काटेकोर पालन केले जाते. या नियमांच्या अनुसार, फाशीची प्रक्रिया सूर्योदयाच्या आसपासच्या वेळी पार पाडायची असते.

या बाबतीत अनेक कारणे दिली गेली आहेत. एक तर यामध्ये आरोपीच्या भावनांचा विचार केला गेला आहे. फाशीचा दिवस उजाडल्यानंतर आरोपीला आपली शिक्षा भोगण्यासाठी फार काळ वाट बघायला लागू नये हे कारण आहे. फाशीच्या शिक्षेच्या कल्पनेने अधिकच अस्वस्थ झालेल्या आरोपीची मनस्थिती अजून खराब होऊ नये असा या मागील विचार असतो.

तसेच कारागृहातील इतर प्रशासनिक कारवाया वेळेत पार पडाव्यात या उद्देशाने देखील फाशीची वेळ सकाळच्या दरम्यानच निश्चित केली जाते. फाशीच्या प्रक्रियेसाठी कारागृहातील अधिकाऱ्यांना देखील अनेक कारवाया पूर्ण कराव्या लागतात. आरोपीला फाशी देण्याआधी त्यांची वैद्यकीय तपासणी करवावी लागते. या प्रक्रियेची नोंदणी अनेक रजिस्टर्स मध्ये व नोट्स मध्ये करावी लागते. फाशीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपीच्या शवाची वैद्यकीय तपासणी व पोस्ट मोर्टेम करवून घ्यायचे असते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फाशी दिली गेलेल्या आरोपीचे शव त्याच्या परिवारजनांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारांसाठी दिले जाते. ह्या संपूर्ण प्रक्रियेला दिवसभराचा वेळ लागतो. त्यामुळे फाशीच्या शिक्षेची वेळ मुळातच लवकरची ठरविण्यात येते, म्हणजे पुढील प्रक्रिया पार पडता येतात.

Leave a Comment