गुगलचा डूडलच्या माध्यमातून भारताच्या पहिल्या महिला वकिलाला सलाम


मुंबई : नाशिकमध्ये जन्मलेल्या कार्नेलिया सोराबजी यांना आज गुगलने डूडलच्या माध्यमातून सलाम केला आहे. भारताच्या पहिल्या महिला बॅरिस्टर होण्याचा सन्मान कार्नेलिया सोराबजी यांना मिळाला होता. त्या एक वकील असण्यासोबतच एक समाजसुधारक आणि लेखिका देखील होत्या. अनेक उपलब्धी कार्नेलिया सोराबजी यांच्या नावावर आहेत. भारतात आणि लंडनमध्ये वकिली प्रॅक्टीस करणा-या त्या पहिला महिलाच नाहीतर त्या मुंबई विद्यापीठामधून ग्रॅज्युएट होणा-याही पहिल्या तरूणी होत्या. तसेच ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणा-या पहिल्या महिला आणि ब्रिटीश युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणा-या पहिल्या भारतीय होत्या.

१८९२ मध्ये नागरी कागद्याचे शिक्षण घेण्यासाठी १५ नोव्हेंबर १८६६ मध्ये जन्मलेल्या कार्नेलिया परदेशात गेल्या होत्या आणि १८९४ मध्ये परतल्या. समाजात त्यावेळी महिलांना वकिली करण्याचा अधिकार नव्हता. कर्नेलिया यांनी अशातही कायद्याचे शिक्षण घेऊन अ‍ॅडव्होकेट होण्याचे ठरवले. महिलांना वकिली पेशात जागा मिळावी यासाठी त्यांनी लढा दिला. आणि १९०७ मध्ये यात त्यांना यशही मिळाले. बंगाल, बिहार, ओडीसा आणि आसाममधील न्यायालयांमध्ये सहायक महिला वकिल पद त्यांना देण्यात आले होटे.

कार्नेलिया या १९२९ मध्ये एक वरिष्ठ वकिल म्हणून निवॄत्त झाल्या. अनेक महिला कार्नेलिया यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुढे आल्या आणि वकिली पेशा त्यांनी अंगिकारला. कार्नेलिया यांचे १९५४ मध्ये निधन झाले. त्या त्यावेळी ८८ वर्षांच्या होत्या. पण आजही त्यांचे नाव सन्मानाने घेतले जाते. केवळ भारतातच नाही तर ब्रिटनमध्येही त्यांना सन्मानाने बघितले जात होले. इंडिया कॉलिंग(१९३४) आणि इंडिया रिकॉल्ड(१९३६) या दोन आत्मकथाही त्यांनी लिहिल्या होत्या.

Leave a Comment