काय होते मुकेश अंबानी यांच्या घरातील कचऱ्याचे; वाचून बसेल तुम्हाला धक्का


सोशल मीडियावरील ज्या बातम्यांमुळे लोक हैराण होतात त्या बातम्या झटपट व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर अशीच एक बातमी सारखीच व्हायरल होत आहे, ज्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटू शकते. मुकेश अंबानींच्या घरातील कच-याचा वापरा कशासाठी केला जातो? ते या बातमीत सांगण्यात आले आहे. युट्युबपासून फेसबुक सर्व ठिकाणी या बातमीची चर्चा होत आहे. एक बातमी अशी व्हायरल झाली होती ज्यात मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरचे वेतन जाहीर झाले होते. पण यावेळी मुकेश अंबानींचे घर एन्टीलियाची बातमी व्हायरल होत आहे. त्यात त्यांच्या घरातील कचऱ्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

मुकेश अंबानींच्या घराचे नाव भारतातील सर्वात मोठे घर म्हणून घेतले जाते. २७ मजली घराची देखभाल करण्यासाठी घरात ६०० कर्मचारी आहेत. त्यांच्याकडून घरातील प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेतली जाते. केवळ या नोकरांच्या हातात सर्वकाही व्यवस्थित करण्याच्या जबाबदारी आहे. सोशल मीडियात त्याच्या घरातील कचऱ्याबद्दल सध्या चर्चा होत आहे. असे सांगितले जाते की त्यांच्या घरातील कचऱ्याचा पुनर्वापर जातो? आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांच्या घरातील विजेची निर्मिती कच-यामधूनच केली जाते ज्याचा उपयोग फक्त त्यांच्या घरातच केला जातो.

दरम्यान मुकेश अंबानी यांच्या घरातील कचरा फेकला जात नाही. पण त्याचा वीज उपयोग निर्मितीसाठी केला जातो. असे सांगितले जाते की एक विशेष यंत्रणेद्वारे कच-यापासून त्यांच्या घरात वीज निर्मिती केली जाते. प्रथम ओला व सुका कचरा वेगळा केला जातो. ज्यानंतर त्यातून वीज निर्मिती केली जाते. अशा मोठ्या घरात सर्वात जास्त वीज वापरली जाते. ज्यासाठी कचऱ्यासारखी गोष्ट वापरली गेली आहे.

Leave a Comment