नवी दिल्ली : केंद्र सरकारने गुवाहाटीमध्ये सुरु असलेल्या जीएसटी परिषदेतून एक मोठी घोषणा केली आहे. २८ टक्क्याच्या स्लॅबमधून सरकारने काही वस्तूंना वगळले असून आता केवळ ५० वस्तूंवरच २८ टक्के जीएसटी कर लागणार आहे. जीएसटीमध्ये सरकारने तब्बल १० टक्क्यांनी कपात केली आहे. हा निर्णय घेऊन सरकारने सर्वसामान्य जनता आणि व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. दैनंदिन वापराच्या वस्तू या निर्णयामुळे स्वस्त झाल्या आहेत.
२२७ पैकी फक्त ५० वस्तूंवरील २८ टक्के जीएसटी कायम
जीएसटी परिषदेतून लोकांना मोठा दिलासा मिळेल असे मानले जात होते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २८ टक्के स्लॅबमधून अनेक वस्तू हटवल्या जाऊ शकतात. एकूण २२७ उत्पादनामधील १७४ वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. म्हणजे केवळ ५० वस्तूंवरच २८ टक्के जीएसटी लागणार आहे. १७४ वस्तूंवरील २८ टक्के जीएसटी घटवून सरकारने १८ टक्के केला आहे. उत्पादने स्वस्त करून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न असेल. गुजरात निवडणुकीत याचा परिणाम बघायला मिळणार आहे. यासोबतच ७ राज्यांमध्ये जानेवारी २०१९ पर्यंत होणा-या निवडणुकांवरही याचा प्रभाव पडेल.