एअरटेल बंद करणार आपली ३जी सेवा!


नवी दिल्ली : एअरटेल टेलिकॉम क्षेत्रात वाढत चाललेल्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी नवनव्या योजना बनवत असून एअरटेलने या योजना राबवण्यासाठी आपली ३ जी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत माहिती देताना एअरटेल इंडीया आणि साऊथ आशियाचे एमडी आणि सीईओ गोपाल विट्टल यांनी सांगितले की, कंपनीने ३ जी सेवेवर गुंतवणूक करणे बंद केले आहे. अशामध्ये ३जीने खाली झालेल्या स्‍पेक्‍ट्रमचा वापर ४जी सेवेसाठी केला जाईल. कंपनीने जुलै -सप्टेंबरमध्ये डेटा कस्‍टमर्स ४ पटीने वाढले आहेत. त्याचबरोबर मोबाईल ब्रॉडब्रँड कस्‍टमर्सची संख्या ३३.६ % वाढून ५.५२ कोटी झाली असल्याचे म्हटले आहे.

गोपाल विट्टल एअरटेलच्या या तीन महिन्यांच्या परिणामांनंतर म्हणाले की, पुढील ३-४ वर्षात ३ जी सेवा बंद होईल. भारतात विकले जाणारे सुमारे ५०% फोन हे फिचर्स फोन आहेत. कंपनीच्या ३जी सेवेमध्ये कामी येणारे २१०० मेगाहर्ट्ज बँडचा वापर ४जी सेवेसाठी केला जाईल.

Leave a Comment