सरकारने पीपीएफ नियमात केले बदल


नवी दिल्ली : पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच पीपीएफ आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) संबंधित नियमांत केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत. परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना या बदलांमुळे मोठा झटका लागू शकतो. केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार जर परदेशात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला अनिवासी भारतीयाचा (एनआरआय)दर्जा मिळाल्यास त्याचे भारतात सुरु असलेले पीपीएफ आणि एनएससी अकाऊंट बंद होऊ शकते.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून अधिकृतरित्या हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. हा बदल सरकारतर्फे पीपीएफ योजना, १९६८ नुसार केला गेला आहे. सरकारतर्फे यासंबंधी काढण्यात आलेल्या अधिसुचनेनुसार पीपीएफमध्ये अकाऊंट सुरु करणारा व्यक्ती जर मॅच्युरिटी काळापूर्वी जर दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतो तर त्याचे अकाऊंट तात्काळ बंद केले जाईल. पीपीएफ अकाऊंट असलेल्या व्यक्तीला यानुसार त्याचे अकाऊंट बंद होईपर्यंतच्या तारखेपर्यंत व्याज मिळेल.

या नियमांनुसार एखाद्या व्यक्तीला एनआरआयचा दर्जा मिळाल्यास त्याच्या एनएससीची रक्कम देण्यात येईल. तसेच त्या तारखेपर्यंतच व्याजही त्याला देण्यात येईल. सरकारच्या या नव्या नियमांनुसार, पीपीएफ, एनएससी आणि पोस्ट ऑफीसतर्फे चालवण्यात येणाऱ्या मासिक आणि वार्षिक अवधीसाठी असलेल्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा अधिकार नसणार आहे.

Leave a Comment