रेल्वेचे तिकीट कन्फर्म न झाल्यास मिळणार हवाई प्रवासाची संधी


मुंबई : राजधानी एक्सप्रेसचे तुम्ही जर एसी फर्स्ट किंवा एसी सेकंड क्लासचे तिकीट काढत असाल आणि ते तिकीट कन्फर्म नाही झाले तर तुम्हाला हवाई प्रवास करण्याची संधी मिळू शकते. पण तुम्हाला ट्रेन तिकीट आणि एअर तिकीटमधील भाड्याचे जे अंतर असेल त्याचे पैसे भरावे लागतील. एअर इंडियाचे चेअरमन असताना मागील वर्षी हा प्रस्ताव अश्वनी लोहानी यांनी रेल्वेला दिला होता. पण रेल्वेने त्यावेळी याबाबत कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली नव्हती. ते स्वत: आता रेल्वे बोर्डाचे चेअरमन असल्यामुळे त्यांनी एअर इंडियाकडून असा प्रस्ताव आल्यास त्याला ते मंजुरी देतील असे म्हटले आहे.

प्रवाशांना राजधानी एक्सप्रेसचे कन्फर्म तिकीट रेल्वेमध्ये डिमांड आणि सप्लायमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर असल्याने मिळत नाही. एअर इंडियाचे माजी चेअरमन लोहानी यांची योजना होती की, एअर इंडियाला रेल्वेने अशा लोकांची माहिती पुरवावी. फ्लाइटमध्ये अशा प्रवाशांना सीट ऑफर केली जाणार आहे. यासाठी जास्त पैसे देखील खर्च नाही करावे लागणार. लोहानी यांनी म्हटले की, राजधानी एसी सेकेंड क्लासचे भाडे आणि विमान प्रवासाचे भाडे यामध्ये जास्त अंतर नाही. तर दुसरीकडे एअर इंडियाला प्रायवेट हातामध्ये सोपवण्याची तयारी सरकार करत आहे.

Leave a Comment