सरकारने ठोठवला मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला १७०० कोटींचा दंड


नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) आणि त्यांच्या भागीरादांना बंगालच्या खाडीमध्ये प्रकल्पात ठरल्यापेक्षा गॅसचे उत्पादन कमी करणे चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी सरकारने कडक कारवाई करत रिलायन्सला तब्बल २६.४ कोटी डॉलर (१,७०० कोटी रूपये) एवढा दंड ठोठवला आहे. ही कारवाई कृष्णा-गोदावरी बेसिनच्या फिल्ड डी६ मध्ये २०१५/१६ या कालावधीत ठरवून दिलेल्या कोठ्यापेक्षा कमी उत्पादन केल्यामुळे करण्यात आली आहे.

दरम्यान यापूर्वीही रिलायन्सला असा दणका मिळाला असून कंपनीला यापूर्वी एप्रिल २०१० पासून सलग सहा वर्षे नियोजीत लक्ष्य गाठण्यात मागे पडल्यामुळे ३.०२ अरब डॉलर एवढा दंड या आधीही झाला होता. हा दंड प्रकल्पातून निघालेल्या गॅसतेलच्या विक्री ते प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पनातून रोख स्वरूपात भरायचा आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

आरआएल सोबत ब्रिटनची बीपी आणि कॅनडाची निको रिसोर्सेस या कंपन्यांचाही केजी डी६ प्रकल्पात समावेश आहे. अशा प्रकारे कारवाई करत दंड वसूल केल्यास त्याचा सरकारी तिजोरीला फायदाच होणार आहे. अधिकाऱ्याने केलेल्या दव्यानुसार, अशा प्रकारे दंड वसूली झाली तर, सरकारला अतिरिक्त १७.५ कोटी डॉलर एवढा फायदा होऊ शकेल.