कर्जतमधील महत्वाच्या धबधब्यावर आणि धरणावर दोन महिन्याची बंदी


मुंबई : दोन महिन्यांची बंदी कर्जतच्या धबधब्यावर फिरायला जाण्यास घालण्यात आल्यामुळे विकएंडला जाणाऱ्यांनी याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निसर्गाचे वरदान मुंबई-पुणे या दोन शहराच्या मध्यभागी असलेल्या कर्जत तालुक्‍याला लाभले असल्यामुळे हजारो पर्यटक पावसाळ्यात कर्जत तालुक्‍यातील धबधब्यावर फिरायला जातात. पण मौज मजा करण्याच्या नादात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. हे निर्बंध त्यामुळे घालण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

दोन जणांचा शुक्रवारी कर्जत तालुक्‍यातील सोनलपाडा धरणात बुडून मृत्यू झाल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून कर्जत तालुक्‍यातील महत्वाच्या धबधब्यावर आणि धरणावर दोन महिन्याची बंदी घातली आहे. त्यामुळे दोन महिने पर्यटकांना या धबधब्यावर आणि धरणावर फिरण्याचा आनंद लुटता येणार नाही.

Leave a Comment