टोयोटाच्या २९ लाख कारचा ‘रि-कॉल’


नवी दिल्ली : कॉर्प एअरबॅगमध्ये खराबी असल्याने २९ लाख वाहनांना जपानची प्रसिद्ध लग्झरी कार निर्माता कंपनी टोयोटाने ‘रि-कॉल’ केले आहे. आत्तापर्यंत एकटय़ा जपानमध्ये ७ लाख ५० हजार वाहनांची विक्री करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना कंपनीने सांगितले, जपान, चीन आणि इतर क्षेत्रांमध्ये २९ लाख वाहनांना एअरबॅगमध्ये बिघाड झाल्याने रि-कॉल करण्यात आले आहे. कंपनीच्या कोरोला एक्सियो सेडान आणि आर. ए. व्ही. -४ एस. यू. व्ही. क्रॉसओव्हर या वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. एअरबॅगमध्ये स्फोट झाल्याने १६ लोकांचा प्राण गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीने तब्बल २९ लाख वाहनांना रि-कॉल करण्यात येणार आहे.

Leave a Comment