शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले तर बँकांचा उडेल बोजवारा


मुंबई – भाजपने उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उत्तरप्रदेशात भाजपने ४०३ पैकी ३२५ जागा लढत विजय संपादन केला. मात्र विजयानंतर आता योगी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देत आपले आश्वासन पूर्ण केले, तर बँकांचे सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे बँका डबघाईला येणार आहेत.

उत्तरप्रदेशातील बँकांनी शेतकऱ्यांना २७ हजार ४२० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. आपले आश्वासन भाजप सरकारने पूर्ण केल्यास त्याचा तोटा या कर्ज देण्याऱ्या बँकांना सहन करावा लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने याबाबत २०१२ ला दिलेल्या अहवालानुसार उत्तरप्रदेशातील अडीच एकरपेक्षा कमी ३१ टक्के जमीनधारक शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेतले आहे. कर्जमाफी जर उत्तरप्रदेशात लागू केली, तर या सरकारला २७ हजार ४१९.७० कोटी रुपये माफ करावे लागतील.

उत्तरप्रदेशातील ४० टक्के नागरिक शेती करुन आपली उपजीविका चालवतात. त्यातील ९२ टक्के नागरिक कमाल धारणेखाली येतात. त्यामुळे राज्याचा ८ टक्के हिस्सा सरकारला कर्जमाफीवर सोडावा लागणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सरकारच्या कर्जमाफी घोषणेची आम्ही वाट पाहत असल्याचे सांगितले.

Leave a Comment