‘जन-धन’ खातेदारांनी युपीआयच्या माध्यमातून बँकेला घातला गंडा


औरंगाबाद : केंद्र सरकारने नोट बंदीनंतर पैशाची देवणाघेवाण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘युनायटेड पेमेंट इंटरफेस’ म्हणजे ‘यूपीआय’ अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्र बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

काही लोकांनी बँकेच्या डिजिटल तंत्रज्ञानातील त्रुटीचा फायदा घेत ही फसवणूक केली आहे. पुणे जिल्ह्यातील २३ शाखांमधील काही खात्यांमधून या पद्धतीने ६ कोटी १४ लाख रुपयांची लूट झाली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र बँकेने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ५० खातेधारकांवर याप्रकरणी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर औरंगाबादेतही १ हजार २१४ बँक खात्यातून ९ कोटी ४३ लाख ६७ हजार रुपये लांबवल्याचे समोर आले आहे.

उल्लेखनीय म्हणजे यात औरंगाबाद शहरातील ८०० खाती आहेत तर उर्वरीत ग्रामीण भागातील आहेत. खास करून बुहुतांशी झिरो बॅलन्स असलेल्या ‘जन धन’ खात्यामधून हा प्रकार झाल्याचे समोर येत आहे. तर नाशिमध्येही असला प्रकार घडला असून दोन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. चौघांकडून पैसै सुद्धा वसूल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. औरंगाबादेतही काही नागरिकांच्या तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment