जिओमुळे आयडियाला ३८५ कोटींचा फटका


नवी दिल्ली : भारतातील मोठ-मोठ्या टेलिकॉम कंपन्यांना रिलायन्स जिओमुळे फटका बसला असून जिओमुळे टेलिकॉम कंपन्यांमध्ये डेटा आणि प्राईज वॉर सुरु झाले आहे. नुकतीच आयडियाची तिमाही आकडेवारी समोर आली आणि जिओमुळे इतर टेलिकॉम कंपन्यांना केवढा फटका बसला आहे, हेही दिसून आले आहे. आयडियाला ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये तब्बल ३८५ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.

विशेष म्हणजे जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत आयडियाला ९१.५ कोटींचा नफा झाला होता. मात्र, पुढील तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये ३८५ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. विशेष म्हणजे याच तिमाहीत भारतीय टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने एन्ट्री घेतली होती. त्यामुळे रिलायन्स जिओचा आयडियाला थेट फटका बसला, हे स्पष्ट आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत ग्राहकांना कायम ठेवण्यासाठी मोबाईल व्हॉईस कॉल रेट्समध्ये १०.६ टक्क्यांची कपात करण्यात आली होती. शिवाय, इंटरनेट डेटाच्या किंमतींमध्ये १५ टक्क्यांची कपात करण्यात आली होती. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत आयडिया सेल्युलरच्या ग्राहकांची संख्या ५.४१ कोटींहून ४.६ कोटींवर घसरली.

Leave a Comment