देशातील तब्बल ९५ कोटी लोक इंटरनेटपासून वंचित


मुंबई : असोचेम आणि डेलोलाईटच्या अहवालात भारतातील तब्बल ९५ कोटी लोक इंटरनेट कनेक्टीव्हिटी पासून लांब असल्याचे म्हटले आहे. जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट सुविधा भारतात उपलब्ध असूनही ही सेवा अद्याप फक्त ३५ कोटी लोकांनाच उपलब्ध झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

इंटरनेटचा प्रसार भारतात जोमाने होत असल्याचे असोचेमने म्हटले आहे. देशात डिजीटल साक्षरता वाढवण्याची गरज असल्याचेही अहवालात म्हटले आहे. इंटरनेटविषयी माहिती देणाऱ्या, माहितीच्या महाजालाचा वापर सुकर व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्था उभ्या करण्याची सूचनाही या अहवालात देण्यात आल्या आहे. जागतिक संस्थाच्या संयुक्त विद्यमानाने देशातील याविषयी कौशल्य विकासाच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात काम करण्याची गरज असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे डिजिटल इंडियाचे स्वप्न कसे साकार होणार आणि कॅशलेस व्यवहारांचा कशी चालना मिळेल, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Leave a Comment