चीनची रासायनिक अंडी भारतात?


नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर अंड्यांसंदर्भातील काही पोस्ट व्हायरल झाल्या असून भारतात चीनमधून रासायनिक अंडी पाठवली जात असल्याची माहिती सोशल मीडियावर पसरली आहे. शरीराला रासायनिक अंडी घातक आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र, चीनमधून रासायनिक अंडी पुरवली जात असून, चीनचा भारतावर एकप्रकारे ‘अंडा अटॅक’ असल्याचे म्हटले जात आहे.

या माहितीचे सरकारने खंडन न केल्यामुळे एकंदरीत प्रकरणाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. सर्व राज्यांना केंद्र सरकारने आदेश दिले आहेत की, अंड्यांसंदर्भातील सोशल मीडियावर फिरणाऱ्या माहितीला अफवा न मानता, बनावट अंड्यांसंदर्भात सतर्क राहावे. छत्तीसगड सरकारने केंद्र सरकारच्या आदेशानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सतर्कतेची सूचना जारी केली आहे. छत्तीसगडमध्ये अद्याप बनावट अंडी सापडली नाहीत. मात्र, संपूर्ण राज्यात अत्यंत बारकाईने तपास सुरु करण्यात आला आहे.

एखादे बनावट अंड्यांचे प्रकरण जरी समोर आले, तरी कठोर कारवाई केली जाईल, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अंडी विकणाऱ्या दुकानदारांकडून अद्याप बनावट अंड्यांसंदर्भात कोणतीही माहिती किंवा तक्रार आलेली नाही. त्यामुळे सध्यातरी दिलासादायक गोष्ट असली, तरी सोशल मीडियावर पसरलेल्या माहितीमुळे सर्व राज्य सतर्कतेच्या भूमिकेत आहेत. जी बनावट अंडी चीनमधून पाठवली जात आहेत, त्यामध्ये घातक रसायन आहे. सोशल मीडियावर रासायनिक अंड्यांसंदर्भातील माहिती खरी असेल, तर शरीराला अशी अंडी घातक आहेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment