नवी दील्ली – १२५ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील केवळ १ टक्का नागरिकच आयकर भरत असल्याचे नीती आयोगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्यावतीने (एनडीआरएफ) आयोजीत कॅशलेस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना अमिताभ कांत यांनी सांगितले की, देशाच्या अर्थव्यवस्थेत ९५ टक्के नागरिक रोखीने व्यव्हार करतात त्यामुळे सरकारला कर मिळत नाही.