रेल्वे प्रवास महागणार !

indian-railway
नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून रेल्वेने प्रवास करणाऱ्या जनतेला दिलेली आश्वासन बाजूला सारून रेल्वे प्रवास आणखी सुखकर होण्यासाठी खास योजना जाहीर करण्याची शक्यता असून रेल्वे प्रवाशांना नवीन सुविधा दिल्यास त्याचा खर्च अर्थातच प्रवाशांकडून वसूल केला जाईल. त्यामुळे पर्यायाने रेल्वे तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे संकेतही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत.

सरकार रेल्वेचे तिकीट दर ठरवण्याचे काम आपल्याकडे ठेवण्याच्या विचारात नाही. तिकीट दर ठरवण्यासाठी ‘रेल डेव्हलपमेंट अथॉरिटी’ असा एक वेगळा विभागच बनवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. हा विभाग एका स्वतंत्र नियामक मंडळासारखे काम करेल.

सरकार कोणत्याही कायद्याची रेल्वे डेव्हलपमेंट अथॉरिटीसाठी निर्मिती करणार नाही. कार्यकारी आदेशानुसार या अथॉरिटीची सुरुवात केली जाणार आहे. म्हणजेच कॅबिनेटने या अथॉरिटीला मंजुरी दिल्यानंतर तातडीने अथॉरिटी आपल्या कामाला सुरुवात करेल. ज्याप्रकारे हवाई प्रवासासाठी सुविधा दिल्यानंतर त्याचा खर्च प्रवाशांकडून वसूल केला जातो, त्याचप्रकारे रेल्वेला यशस्वी बनवण्यासाठी अशा सुविधा सुरु करुन पावले उचलण्याची गरज असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले. आजच्या घडील रेल्वे प्रत्येक तिकिटातील ५७ टक्के रक्कम प्रवाशाकडून वसूल करते, तर उर्वरित रकमेसाठी केंद्राकडून अनुदान मिळते.

Leave a Comment