मुंबई : मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी स्वागत केले आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने अत्यंत धाडसी पाऊल उचलल्याचं टाटांनी ट्वीटरवर म्हटले आहे. रुग्णालयात सध्या अनेकांची गैरसोय होत आहे. ती टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करायला हव्यात अशी सूचनाही टाटांनी मोदी सरकारला केली आहे.