पुणे – चलनातील १ हजारांच्या आणि पाचशेच्या नोटा बंद करण्याचा मोठा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आणि त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. मोदी सरकारचा हा निर्णय काळ्या पैशांना आळा घालण्यासाठी महत्वाचा मानला जात आहे. तुमच्याकडील १ हजारांच्या आणि पाचशेच्या जुन्या नोटा येत्या ५० दिवसात बदलून घ्यायच्या आहेत. त्याजागी आता २ हजारांच्या आणि ५०० च्या नव्या नोटा चलनात येणार आहेत. यावर सोशल मिडियात चांगलाच हशा पिकला आहे.
”विवाहित पुरूषांसाठी खूशखबर…ज्या बायकांनी नवऱ्यापासून पैसे लपवून (५००, १०००च्या नोटा) ठेवले आहेत त्यांचेही काळे धन आता बाहेर निघणार”
”आज भारतात पहिल्यांदा गरिब हसत आहे आणि श्रीमंत रडत आहे”
”हे वर्ष भारीच, देवाने सगळेच ऐकले..
येरे येरे पावसा..
तुला देतो पैसा
पाऊस आला मोठा
पैसा झाला खोटा”
”पुणेरी लग्न पत्रिका,
कृपया आहेराच्या पाकिटात 500, 1000 च्या नोटा खपवू नये”
”पोलीस : लायसन्स आहे का ?
मी : नाही
पोलिस : 100 ची पावती करावी लागेल
मी : 500 घ्या सोडून द्या”
नोकर वर्ग…
पगार झाल्यावर 100 च्या नोटांनी
खिसा अगदी गच्च भरेल
फिलींग ऑसम”
”पुणेरी पाटी…
येथे हजार पाचशेच्या नोटांची रद्दी घेतली जाईल..”
”आज ज्यांना शांत झोप लागणार तेच सर्वात श्रीमंत”