
मुंबई – लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एलआयसीमध्ये पार्ट टाईम नोकरीची संधी उपलब्ध झाली असून एलआयसीमध्ये २६० जागांसाठी भरती होणार आहे. एलआयसीमध्ये होणारी ही भरती प्रक्रिया सल्लागार पदासाठी होणार आहे.
कमीत कमी १०वी पास असलेल्यांसाठी एलआयसीमध्ये २६० जागांसाठी भरती,
ऑनलाईन पद्धतीने एलआयसीमध्ये होणारी ही भरती प्रक्रिया होत असुन यासाठी इच्छुक उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २९०१७ आहे.
पद – सल्लागार
पदांची संख्या – २६०
अर्ज करण्याची अंतिम तारिख – ३१ डिसेंबर २०१७
शिक्षण – १०वी आणि त्यापेक्षा अधिक
वय – १८ ते ३३
इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी maharojgar.gov.in या लिंकवर क्लिक करावे. एलआयसीमध्ये होत असलेल्या या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कुठल्याही प्रकारच्या अनुभवाची आवश्यकता नाही. तसेच दहावी पास असलेल्यांनाही या पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर त्वरा करा आणि या संधीचा फायदा नक्की घ्या.
