नवी दिल्ली – भारत-पाकिस्तान यांच्या युद्धच्या भीतीने भारताचे शेअर मार्केट ५५५ अंकानी कोसळले आहे. भारताने जशास तसे उत्तर देत पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळावर हल्ले केल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील हलचालींना वेग आला आहे. गृहमंत्रालयाने तातडीची बैठक बोलावली असून, पुढील रणणिती आखली जाणार आहे. तर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हेही दिल्लीकडे रवाना झाले आहे. युद्धच्या भीतीमुळे निफ्टी १७० अंकाने ढासाळला आहे. या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून प्रतिक्रिया अली असून, माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी ‘आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही कमजोर नसल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले आहे.