दिल्लीचा रिक्षावाला देत आहे फ्री वायफाय सेवा

free-wifi
नवी दिल्ली : इंटरनेट सेवेची आता भारतातील प्रत्येक व्यक्तीला गरज भासू लागली असून याच गोष्टीचे गांर्भिय लक्षात घेत आग्रा येथील इफराक खान या रिक्षा चालकाने स्वत:च्या रिक्षामध्ये वायफाय सुविधा सुरु केली आहे.

याबाबत इफराक म्हणतो की, मोठ्या प्रमाणात पर्यटक आग्रा येथे येत असतात. त्यांच्यासाठी त्यांनी ही वायफाय सेवा सुरु केली आहे. इफराक खान म्हणतो की, भारतात विदेशातून पर्यटक येतात तेव्हा त्यांना इंटरनेटची आवश्यकता असते. पर्यटक जेव्हा रिक्षामध्ये बसतात तेव्हा त्यांच्याकडे इंटरनेट सेवा नसते. यामुळेच त्याने रिक्षामध्ये फ्री वायफाय सेवा देण्याचे ठरवले आहे.

Leave a Comment