नवी दिल्ली: रिलायन्स कम्युनिकेशनने कॉल ड्रॉप समस्येवर तोडगा म्हणून अॅप-टू-अॅप कॉलिंग ही नवी स्कीम लाँच केली असून कंपनी या स्कीममध्ये आपल्या दिल्ली-एनसीआरच्या ग्राहकांना अवघ्या १ रुपयात ३०० कॉलिंग मिनिटे उपलब्ध करुन देणार आहे. ज्याची वैधता ३० दिवसांपर्यंत असणार आहे.
रिलायन्स १ रुपयात देणार ३०० कॉलिंग मिनिटे
या स्कीमला कंपनीने ‘कॉल ड्रॉपपासून सुटका’ असे नाव दिलं आहे. रिलायन्सचे बिजनेस सीईओ गुरदीप सिंह यांनी सांगितले की, दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना भारतातील पहिल्या अॅप-टू-अॅप स्कीमचा फायदा मिळणार आहे. याची वैधता ३० दिवसांपर्यंत असणार आहे. अवघ्या १ रुपयात ग्राहकांना ३० दिवसासाठी दररोज १० मिनिटे कॉलिंग टाइम मिळेल. म्हणजेच तुम्ही १ रुपयात दररोज १० मिनिटाच्या हिशोबाने ३० दिवसांपर्यंत ३०० मिनिटे बोलू शकता. मात्र, ही डेटा कॉलिंग स्कीम आहे. म्हणजेच व्हॉट्सअॅप आणि कॉलिंग अॅपवरुन तुम्ही फोन कॉल करु शकता.