‘अतुल्य भारत’चे सदिच्छा दूत पंतप्रधान नरेंद्र मोदीच ?

modi
नवी दिल्ली: पर्यटन विभागाच्यावतीने ‘अतुल्य भारत’चा सदिच्छा दूत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून त्यासाठी पर्यटन मंत्रालयाने ‘अतुल्य भारत’साठी कोणाच्याही नावाची घोषणा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच यासाठी गुजरात पर्यटनच्या धर्तीवर पर्यटन विभाग एक डझनहून अधिक प्रमोशनल फिल्म बनवणार आहेत. नुकत्याच केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या मार्केटिंग टीमने दिलेल्या अहवालात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या देशांचा दौरा केला, त्या देशांतून पर्यटकांची संख्या वाढली असल्याचे म्हटल्यामुळे पर्यटन मंत्रालयाने आता इतर कोणाही व्यक्तीच्या नावाला ‘अतुल्य भारत’चा सदिच्छा दूत म्हणून घोषित न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदीच अतुल्य भारतचा नवा चेहरा असतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment