राजन यांचा टीकाकारांना सवाल

raghuram-rajan
मुंबई – रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी महागाई कमी असल्याचा गाजावाजा करणाऱ्या टीकाकारांना कशी महागाई कमी आहे, हे दाखविण्याचे आव्हान दिले. राजन यांनी विकासापेक्षा किमती कमी ठेवण्याला प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले.

राजन सरकार आणि सरकारी धोरणांबाबत स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आर्थिक सुधारणांचा वेग हा निराशाजनक असून, सलग दोन वर्षे पडलेला दुष्काळ, कमकुवत जागतिक अर्थव्यवस्था आणि ब्रेक्‍झिटसारखे बाह्य धक्के यांचा सुधारणांवर परिणाम होत आहे. सगळ्या मर्यादा असूनही भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असून, चांगला मॉन्सून; तसेच रचनात्मक सुधारणा, सूक्ष्म आर्थिक स्थैर्य यामुळे विकासाचा वेग आगामी काळात वाढेल.

व्याजदरात कपात राजन यांनी केली नाही, अशी टीका केली जाते. यावर बोलताना ते म्हणाले, किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ जूनमध्ये सलग चौथ्या महिन्यात वाढून ५.७७ टक्‍क्‍यांवर पोचली आहे. कोणत्याही आर्थिक आधाराशिवाय यावर चर्चा होताना दिसतो. मागील आठवड्यात किरकोळ चलनवाढ ५.८ टक्के होती; तर रेपो दर ६.५ टक्के आहे. याबाबत चर्चा करणाऱ्यांनी चलनवाढ कशी कमी आहे हे दाखवून द्यावे. अशा प्रकारच्या टीकेकडे मी देत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

देशांतर्गत एकूण उत्पादनाचा (जीडीपी) आकडा बऱ्याच वेळा आधीपासून प्रस्तावित केलेला असतो. ७.६ आणि ८ टक्के हे दोन्ही आकडे जवळचे आहेत. आर्थिक समावेशकतेचे धोरण राबविताना प्रत्येक खेड्यात बँकेची शाखा काढणे व्यवहार्य नाही आणि ते परवडण्यासारखे नाही. त्यासाठी मोबाईल शाखा अथवा सूक्ष्म शाखा असे पर्याय रिझर्व्ह बॅंक पडताळून पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment