राजन यांच्या प्रतिष्ठेमुळेच भारताचे चलन स्थिर

d-subbarao
मुंबई – माजी आरबीआय गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी भारताचे चलन भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या प्रतिष्ठेमुळेच स्थिर झाले आणि परकीय गंगाजळीच्या साठ्यात वाढ झाल्याचे म्हटले.

भारतीय चलनाला तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्या धोरणामुळेच मोठा फटका बसल्याचेही त्यांनी म्हटले होते. भारतातील वातावरणामुळेच त्या काळी रुपयाची स्थिती खालावली होती असे त्यांनी म्हटले. भारतातील आर्थिक सुधारणांकडे पी. चिदम्बरम यांनी दुर्लक्ष केले. त्यांच्या ही बाब लक्षात आली नसेल असे नाही, परंतु राजकीय स्वार्थ लक्षात घेऊन त्यांनी या बाबीकडे कानाडोळा केल्याचे त्यांनी म्हटले. व्हू मूव्हड माय इंटरेस्ट रेट्स- लीडिंग द रिजर्व्ह बॅंक थ्रू फाइव्ह टर्बुलंट इअर्स हे पुस्तक सुब्बाराव यांनी लिहिले आहे. त्याच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. पुढील महिन्यात हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध होईल.