नवी दिल्लीः राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ म्हणजेच एनसीसीएफला केंद्र सरकारने ग्राहकांना डाळ ६० रुपये प्रति किलोने विकावी, असे निर्देश दिले असून केंद्र सरकारने हा निर्णय डाळींच्या वाढत्या किंमतीवर उपाय म्हणून घेतला आहे.
६० रुपये प्रति किलो दराने मिळणार हरभरा डाळ
अगोदरपासूनच मदर डेअरी आणि केंद्रीय भांडार यांच्यासोबत एनसीसीएफ मिळून तूर आणि उडीद डाळ १२० रुपये प्रति किलो दराने विकत आहे. तूर डाळ आणि उडीद डाळीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्यानंतर दिल्लीमध्ये हरभरा डाळीचेही दर गगनाला भिडले आहेत. त्यानंतर सरकारने उपाय म्हणून हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. डाळींच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवता यावे यासाठी एनसीसीएफला स्वस्त दरात डाळ विकण्याचे निर्देश दिले असल्याचे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने एका पत्रकाद्वारे म्हटले आहे.