२.२ लाख कर्मचा-यांची भरती करणार मोदी सरकार

vacancy
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचा-यांच्या तब्बल २.२ लाख रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली असून आगामी २ वर्षांत ही नोकरभरती करण्याचे नरेंद्र मोदी सरकारने ठरवले आहे. २०१६-१७ च्या अर्थसंकल्पानूसार १ मार्च २०१५ पर्यंत केंद्रसरकारी कर्मचा-यांची संख्या ३३.०५ लाख होती, जी २०१६ला वाढून ३४.९३लाख झाली आहे. नवीन नोकरभरतीमुळे १ मार्च २०१७पर्यंत केंद्रिय कर्मचा-यांची संख्या ३५.२३ लाख होणार आहे. यात रेल्वे विभागाचाही समावेश आहे. सध्या रेल्वेत १३ लाख २६ हजार ४३७ कर्मचारी आहेत.

प्रस्तावित नोकरभरती योजनेनूसार महसूल विभागात ७० हजार कर्मचाऱयांची भरती केली जाणार आहे. यानंतर सर्वाधिक नोकरभरती ४७ हजार इतकी निमलष्करी दलात होणार आहे. याव्यतिरिक्त गृहमंत्रालयातील कामांसाठीही ६ हजार कर्मचा-यांची भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिका-याच्या माहितीनूसार केंद्र सरकारच्या कित्येक विभागात गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱयांची भरती झालेली नाही. सर्व विभागांत सध्या जवळपास ६ लाख पदे रिक्त आहेत.

Leave a Comment