माल्ल्याकडील दमडी ही सोडणार नाही – जेटली

arun-jaitely
नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याकडून पै न पै वसूल केली जाईल असे म्हटले आहे. विजय माल्ल्या देशातील १७ बॅंकांना तब्बल ९ हजार कोटी रुपयांचा चुना लावून देश सोडून फरार झाले आहेत. केंद्र सरकारने त्यांच्याबाबत आज आपली भूमिका स्पष्ट केली. विजय माल्ल्यांकडून एक एक दमडी वसूल केली जाईल. देशातील प्रत्येक चौकशी यंत्रणा व अंमलबजावणी संचालनालय सध्या विजय माल्ल्यांच्या प्रकरणावर काम करत असल्याचे जेटली म्हणाले. तसेच वस्तुस्थिती अत्यंत स्पष्ट असून सरकारची प्रत्येक यंत्रणा माल्ल्यांविरोधात कठोर कारवाई करेल. माल्ल्यांकडून सरकारी बॅंकाही पै न पै वसूल करतील, असे जेटली म्हणाले.

Leave a Comment