लग्नाला कंटाळले आहेत २८ टक्के भारतीय

wedding
नवी दिल्ली : लग्न म्हणजे जन्मोजन्मीचे बंधन असे भारतात मानले जाते. एकाच व्यक्तीसोबत पुढची सात वर्ष व्यतीत करण्याच्या आणाभाकाही लग्नात घेतल्या जातात. पण, याच जन्मात अनेक भारतीय आपल्या लग्नाच्या बंधनाला कंटाळल्याचे समोर आले आहे.

होय, एका सर्वेक्षणानुसार जवळपास २८ टक्के भारतीय आपल्या लग्नाला कंटाळले आहेत. एका इंग्रजी वेबसाईटने एका सर्वेक्षणाचा दाखला देत भारतातील लोकांचा सेक्स बाबतीत आकर्षण कमी होत असल्याचे म्हटले आहे. पूर्वीपेक्षा आता मात्र आठवड्यात केवळ अर्धा तास लोक लैंगिक संबंधांसाठी देतात. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेले १६.६ टक्के लोक आपल्या वैवाहिक सेक्स लाईफबाबत असंतुष्ट होते.

सर्वेक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या अधिकांश लोकांनी हे मान्य केले की लग्नानंतर काही वर्षांपर्यंत त्यांचे आपल्या पार्टनरसोबत संबंध चांगले होते. परंतु कालांतराने ते एकमेकांपासून दूर होऊ लागले. आता ते आपल्या लग्नाला खुपसे कंटाळले आहेत, असेही बऱ्याच जणांनी मान्य केले आहे.

Leave a Comment