महानायकासह प्रियंकाही म्हणणार ‘अतिथी देवो भव’

combo
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राही आता महानायक अभिताभ बच्चन यांच्यासह भारत सरकारच्या अतुल्य भारत अभियानाची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर
असणार आहे.

प्रियंका चोप्रासोबत भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने तीन वर्षांचा करार केला असून प्रियांका चोप्राला महिला सुरक्षेच्या दृष्टीने भारताची प्रतिमा देश-परदेशात सादर करण्यासाठी या अभियानाची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवण्यात आल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

अतुल्य भारतच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर पदावरुन आमीर खानला हटवल्यानंतर पर्यटन मंत्रालयाने अमिताभ बच्चन यांना ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवळे. प्रसून जोशी मॅकेन एरिक्सन लिमिटेड या कंपनीसोबत २.६९ कोटी रुपयात ‘अतुल्य भारत’ अभियानाचा करार झाला होता. मात्र तो करार रद्द झाल्याने आता आमीर खान अतुल्य भारतचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर नसेल, असे स्पष्टीकरण पर्यटन विभागाने दिल्यामुळे अमिताभ बच्चन आणि प्रियंका चोप्रा आता दोघेही अतिथी देवो भव म्हणताना दिसतील. विशेष म्हणजे या दोन्ही कलाकारांनी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून कोणतेही मानधन घेतलेले नाही.

Leave a Comment