९० वर्षाच्या आजोबांना पुन्हा चढायचे आहे बोहल्यावर

wedding
अहमदाबाद : इतर कोणत्याही गरजांपेक्षा उतारवयात माणसांना अधिक महत्त्वाची असते ती सोबतीची गरज. काही कारणांमुळे अनेकदा ज्येष्ठांना एकाकी आयुष्य जगाव लागत. यावेळेस पैसा-संपत्तीपेक्षा त्यांना सोबत महत्त्वाची असते. अशाच एकाकीपणाला कंटाळलेले ९० वर्षाचे गुजरातचे मनसुख लाल (नाव बदललेले) यांना पुन्हा लग्न करायचे आहे.

३० वर्षांपूर्वी बँकनिवृत्त असलेल्या मनसुखलाल यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहे. सध्या ते एका मुलीकडे राहतात. त्यासाठी ते दरमहिन्याला तब्बल १७ हजार रुपये भाडेही देतात. तर जेवणासाठी त्यांना मुलाला दरमहिन्याला सहा हजार रुपये देतात. माझ्या मुलांना माझ्यापेक्षा जास्त माझ्याकडे असलेल्या पैशांमध्ये अधिक रस आहे. मला एकाकीपणाचा कंटाळा आला आहे. यासाठीच मला दुसरे लग्न करायचे आहे. जेणेकरुन अखेरचे दिवस तिच्यासोबत घालवू शकेन, असे त्यांचे म्हणणे असून त्यांनी यासाठी एका विवाहसंस्थेत नावही नोंदवले आहे.

Leave a Comment