नवी दिल्ली- रोजगार बाजारपेठेसाठी नवीन वर्षात गुड न्यूज असून तब्बल १० लाख कर्मचा-यांना कंपन्या आपल्या पेरोलवर घेण्याची शक्यता असून बुद्धीमानांना १० ते ३० टक्के इतकी पगारवाढही मिळण्याची शक्यता आहे.
मनुष्यबळ विकास आणि हेडहंटर्सच्या अनुसार, २०१५ मध्ये कॉर्पोरेट जगतात भरतीबाबत उत्साही वातावरण होते आणि या वर्षातही तसेच कायम राहील. आर्थिक विकासाचे अनुकूल भाकित आणि रिटेल, वित्तीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात स्टार्ट अप सुरु होत असल्याने नोक-यांच्या बाबतीत उत्साह राहील.
याशिवाय अनेक क्षेत्रात परकीय गुंतवणूकदारांना संधी खुल्या केल्या जाणार असल्याने व अनेक जागतिक कंपन्या भारतात उतरत असल्यानेही रोजगार बाजारपेठेला आणखी चालना मिळणार आहे.